संपादकीय: सगळ्याच जिभा घसरल्या !

By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2024 08:04 AM2024-05-07T08:04:18+5:302024-05-07T08:06:20+5:30

सर्वसामान्य मतदारांचीदेखील अशावेळी जबाबदारी वाढते. ताे मात्र प्रसारमाध्यमांना दाेष देऊन नामानिराळा हाेताे, हे काही बराेबर नाही.

Editorial: All tongues dropped! loksabha Election politics | संपादकीय: सगळ्याच जिभा घसरल्या !

संपादकीय: सगळ्याच जिभा घसरल्या !

अठराव्या लाेकसभेची सार्वत्रिक निवडणूक तिसऱ्या टप्प्यात आली आहे. अद्याप चार टप्पे बाकी आहेत. महाराष्ट्रात आणखी दाेन टप्पे हाेणार आहेत. अठरावी सार्वत्रिक निवडणूक असल्याने तिची वाटचाल प्रगल्भतेकडे हाेईल, अशी अपेक्षा हाेती. मात्र, सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांची भाषणे, वक्तव्ये, आरडाओरडा, टीकाटिप्पणी ऐकून असे वाटते की, राजकीय जीवनाचा स्तरच खालावताे आहे. भाषा घसरते आहे. याचा गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे.

सर्वसामान्य मतदारांचीदेखील अशावेळी जबाबदारी वाढते. ताे मात्र प्रसारमाध्यमांना दाेष देऊन नामानिराळा हाेताे, हे काही बराेबर नाही. आपल्या देशासमाेर महत्त्वाचे प्रश्न काेणते आहेत? जगभरात हाेणारे बदल काेणत्या भाषेत सांगितले जात आहेत? हवामान बदलापासून ते अन्नधान्य टंचाईपर्यंत आपल्या साऱ्यांचा संबंध आहे. याचा थेट सामना करावा लागणार आहे. आंतरराष्ट्रीय व्यापारात भारत खालच्या स्तरावर आहे. पायाभूत सुविधा निर्माण करण्यातील धाेरणात खाेट आहे, त्याचा व्यापार झाला आहे. लाेकसंख्या वाढीचा वेग काही आवरता येत नाही. महत्त्वाचे म्हणजे ज्या देशाची निम्मी लाेकसंख्या कृषिक्षेत्रावर अवलंबून आहे, त्या क्षेत्रातील गंभीर प्रश्नांची उकल करणारी मांडणी करताना एकही राजकीय पक्ष गंभीर नाही. महागाई वाढते आहे, बेराेजगारीचा आकडा दरवर्षी फुगताे आहे. शिक्षण आणि राेजगाराचा संबंध दुरान्वयेही राहिलेला नाही. बहुतांश सर्वच क्षेत्रांत प्रचंड विराेधाभास निर्माण झालेला असताना आपल्या राजकीय नेत्यांची भाषा एकमेकांची उणीदुणी काढणारी आहे. ही भाषा वापरण्याचे धाडस हाेतेच कसे? काही राजकीय पक्षांनी तर धादांत खाेटा प्रचार करण्याचा विडाच उचललेला आहे. देशाचा इतिहास काय सांगताे आहे? भारतीय परंपरा काय सांगते, याचे साधे भान नाही. ज्यांना राजकारण आणि विचारसरणी म्हणजे काय असते, देश-समाज उभारणी कशाला म्हणतात याचा थांगपत्ता नाही असेच नेते बाष्कळ बडबड करतात.

महाराष्ट्रात तरी एक उच्च परंपरा गतकाळातील धुरंधर राज्यकर्त्यांनी निर्माण केली आहे. निदान त्याची तरी उजळणी करा. बारामती लाेकसभा मतदारसंघात पवार विरुद्ध पवार असा सामना प्रथमच हाेताे आहे. संपूर्ण देशाचे लक्ष त्या मतदारसंघाकडे लागले आहे. तेथे एकमेकांना बघून घेण्याची भाषा वापरली जात आहे. काैटुंबिक उणीदुणी काढली जात आहेत. असे महाराष्ट्राच्या राजकारणात कधी घडले नव्हते. आपल्या महाराष्ट्राने सर्वाधिक प्रगती साधली असली तरी त्या प्रगतीतून असमताेल निर्माण झाला आहे. मुंबई-ठाणे-नाशिक-पुणे या चतुष्काेनात नागरीकरणाचा स्फाेट झाला आहे. त्यातून निर्माण झालेल्या गंभीर प्रश्नांचा स्फाेट हाेण्याची वेळ आली आहे. उर्वरित महाराष्ट्र पाण्यासाठी तडफडताे आहे. राेजगारासाठी स्थलांतरित हाेताे आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील बिनपाण्याची शेती कधीच गाेत्यात आली आहे. ऐंशी टक्के काेरडवाहू महाराष्ट्राचा प्रश्न कसा साेडविणार, याचे उत्तर देता येत नाही. मात्र, ‘उचलली जीभ लावली टाळ्याला’ या म्हणीप्रमाणे सर्वच राजकीय पक्षांचे प्रवक्ते, नेते आणि आमदार, खासदार, उमेदवार, मंत्री एकमेकांना शिव्या देत महाराष्ट्रभर फिरत आहेत.

हेमंत करकरे यांना काेणी मारले, हा विषय आता उपस्थित करण्याची गरज आहे का? त्याचा तपास राजकारण बाजूला ठेवून करायचा असताे. ताे झालादेखील पाहिजे. कसाब या अतिरेक्याला बिर्याणी खाऊ घातली गेली, अशी खाेटी वक्तव्ये करून महाराष्ट्रासारख्या उत्तम प्रशासकीय व्यवस्थेची लक्तरे बाहेर काढताना सभ्यता कशी साेडली जाते? माजी गृहमंत्र्यांना तुरुंगात टाकले जाते, राज्य बँकेत पंचवीस हजार काेटींचा घाेटाळा झाला म्हणणारेच आता फाइल बंद करून काही घडलेच नाही, अशा आविर्भावात कसे वागू शकतात? महाराष्ट्रातील मतदार म्हणजे काेण वाटले? त्यांना गृहीत धरून वाटेल ते बाेलणाऱ्यांना लगाम घालण्याची हिंमत राजकीय नेतृत्वात नाही. मात्र, मतदार हे पाहत नाही, ऐकत नाही, त्याची सत्यता पडताळत नाही, असे काेणी समजू नये. युद्धात आणि प्रेमात सारे माफ असते, असे म्हणत म्हणत या राजकीय नेत्यांनी कोणतीही भाषा कशाही पद्धतीने वापरत काहीही केले तरी चालते असे समजू नये. सामान्य माणसांच्या मनात राग आहे. हा राग ताे संधी मिळताच व्यक्त करीत असताे याची जाणीव ठेवून प्रचार करताना भाषेची घसरण हाेणार नाही याची काळजी घेतली पाहिजे.

Web Title: Editorial: All tongues dropped! loksabha Election politics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.