प्रसंगावधान ते आणायचं कुठून?

By admin | Published: September 4, 2014 04:43 PM2014-09-04T16:43:59+5:302014-09-04T16:43:59+5:30

मुलाखतीत तुम्हाला एखादा प्रश्न विचारला जातो, उत्तर सोडा, प्रश्नही कानावरून गेलेला नसतो, अशावेळी काय करता तुम्ही ?

Where to get the event? | प्रसंगावधान ते आणायचं कुठून?

प्रसंगावधान ते आणायचं कुठून?

Next
>विनोद बिडवाईक
 
‘फॅक्टरीज अॅक्ट कोणत्या सेक्शन खाली कंपनीच्या संचालकांना अटक होऊ शकते?’ 
-असा एक प्रश्न एका हुशार मुलाखतकर्त्याने नुकत्यात एमबीए झालेल्या हुशार मुलाला विचारला. याचं उत्तर मुलाखतकर्त्याला  कितपत माहिती होतं, माहीत नाही, पण त्या विद्यार्थ्याने उत्तर दिलं. ‘‘सर,  फ्रॅकली स्पिकिंग मला हा सेक्शन आठवत नाही, पण जर माझं सिलेक्शन  झालं तर कंपनीच्या संचालकांना अटक होणार नाही एवढं परफेक्ट काम मात्र माझं असेल.’’
हे उत्तर चूक होतं की बरोबर, हा प्रश्न वेगळा. पण त्या तरुणानं प्रसंगावधान दाखवून वेळ धकवून नेली. रोजच्या जीवनात घडणा-या किती गोष्टी आपल्या लक्षात राहतात? त्यातील किती गोष्टी आपल्या मनाप्रमाणो घडतात आणि किती गोष्टी तुमच्यावर प्रभाव गाजवतात याचे एक तुलनात्मक स्टेटमेंट बनवल्यावर आपल्या लक्षात खूप काही विचार येतात आणि एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे कॉमनसेन्स आणि प्रसंगावधान. या गोष्टी आपल्याला यशाच्या पायरीर्पयत निश्चितच घेऊन जाऊ शकतात.
आपल्या रोजच्या जीवनात असंच प्रसंगावधान अपेक्षित आहे. पण सर्वानाच ते जमतं असं नाही. प्रसंगावधान  ही संभाषण चातुर्याची पहिली पायरी आहे. एखाद्या क्रिटिकल परिस्थितीत आपण गोंधळतो, काय करावं नेमकं हेच आठवत नाही. डोक्यात येत नाही तेव्हा हे प्रसंगावधान कामी येतं.
काही लोकांनाच ही कला जमते? पण त्यांनाच का जमते? प्रयत्न केला तर थोडय़ाशा अनुभवानं  तुम्हालाही जमू शकेल. मुळात प्रसंगावधानाची  आवश्यकता कोठे पडते? ती साध्या घटनात फारसं महत्त्व ठेवत नाही, पण अशा बुद्धीचा कस लागतो तो एखाद्या गंभीर घटनेत. खरंतर मोक्याच्या घटनांच्या वेळी तर्कसंगत बुद्धीचा योग्य वेळी वापर करून परिस्थिती निभावून नेणं म्हणजे हे प्रसंगावधान.
प्रश्न आहे ते आणायचं कुठून? दाखवायचं कसं ? एखाद्या घटनेकडे बघताना, एखादी घटना अनुभवताना एक महत्त्वाची गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. ती म्हणजे प्रत्येक गोष्टीचं विश्लेषण करण्याची कुवत. जॉब करताना आणि करिअरच्या पाय:या चढताना प्रत्येकवेळी अगदी किचकट आणि कठीण पद्धतीनंच प्रश्न सोडवायची गरज नसते.  इंटरव्ह्यू देताना, प्रेङोण्टेशन देताना, एखाद्या प्रश्नाचं उत्तर देताना, एखादी परिस्थिती सांभाळताना ब:याचदा हे प्रसंगावधानच उपयोगी येतं.  तुमच्या अवतीभोवती तुमच्या संबंधित घटना घडते. अगदी स्पंजप्रमाणो ती घटना आणि त्या घटनेमागचं लॉजिक टिपून घेतलं की, तुम्हाला विचारांची संगती लावता येईल.
काही व्यक्ती बोलण्यात चतुर असतात, त्या शाब्दिक कोडी छान करतात, प्रसंगनिष्ठ विनोद करतात. एखादं वातावरण हलकंफुलकं करतात. कारण एखादी विसंगती टिपण्यासाठी आवश्यक असणारी त्यांची निरीक्षणशक्ती अफाट असते. तो त्यांचा स्थायीभाव बनतो, अशा व्यक्तीचं प्रत्येक बोलणं हे त्याचं प्रसंगावधान असतं. नव्या काळात हे शिकावंच लागेल. तर आणि तरच निभाव लागण्याची काही शक्यता आहे.
 
 

Web Title: Where to get the event?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.