सर्व शिक्षा अभियान गुंडाळणार गाशा, नवीन भरतीवर निर्बंध आर्थिक वर्ष सुरू होऊनही निधीची ‘टंचाई’

By admin | Published: April 18, 2015 12:42 AM2015-04-18T00:42:47+5:302015-04-18T00:43:39+5:30

सर्व शिक्षा अभियान गुंडाळणार गाशा, नवीन भरतीवर निर्बंध आर्थिक वर्ष सुरू होऊनही निधीची ‘टंचाई’

Sarva Shiksha Abhiyan will be rebuilt, restrictions on recruitment, despite the financial year, the 'shortage of funds' | सर्व शिक्षा अभियान गुंडाळणार गाशा, नवीन भरतीवर निर्बंध आर्थिक वर्ष सुरू होऊनही निधीची ‘टंचाई’

सर्व शिक्षा अभियान गुंडाळणार गाशा, नवीन भरतीवर निर्बंध आर्थिक वर्ष सुरू होऊनही निधीची ‘टंचाई’

Next

  नाशिक : केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी सर्व शिक्षा अभियानाला घरघर लागल्याचे वृत्त असून, विभागांतर्गत नव्याने पद भरतीवर बंदी घालण्यात आली असून, कुठलेही कंत्राटी पद भरताना ते ३० सप्टेंबर २०१५ अखेरपर्यंतचेच असावे, अशाही सूचना विभागाला देण्यात आल्याचे समजते. दरम्यान, नाशिक जिल्हा परिषदेने सन २०१५-१६ या आर्थिक वर्षासाठी पाठविलेला २०९ कोटींचा प्रस्तावही अद्याप कागदावरच असून, त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांच्या मोफत पाठ्यपुस्तके व गणवेश पुरवठा योजनाही धोक्यात आल्याचे चित्र आहे. नाशिक जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागांतर्गत असलेल्या सर्व शिक्षा अभियानाच्या वतीने महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण परिषदेकडे सुमारे २०९ कोटी १३ लाखांचा विविध मागण्यांचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. त्यात विद्यार्थी व विद्यार्थिनींना मोफत गणवेश पुरवठा योजनेंतर्गत जिल्'ातील २ लाख ५० हजार ७९० विद्यार्थ्यांना मोफत गणवेशचा पुरवठा करण्यासाठी १३ कोटी १८ लाख रुपयांची मागणी करण्यात आली आहे. तसेच मोफत पाठ्यपुस्तके पुरवठा करण्यासाठी जिल्'ातील ७ लाख ९० हजार २५५ विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांसाठी १४ कोटी ७५ लाखांच्या निधीची मागणी नोंदविण्यात आली आहे.

Web Title: Sarva Shiksha Abhiyan will be rebuilt, restrictions on recruitment, despite the financial year, the 'shortage of funds'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.