शहरं
Join us  
Trending Stories
1
व्यासपीठावर बसायला खुर्ची नाही, निलेश लंके खाली मांडी घालून बसले; शरद पवार म्हणाले...
2
अनेकांची नावं मतदार यादीतून 'गायब'! फेरमतदानाची मागणी करणार; तामिळनाडू भाजपाध्यक्षांचा दावा
3
गोव्यासाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक; सोनिया, राहुल, प्रियांका, खरगे यांचा समावेश
4
लखनौने गड राखला! लोकेश राहुल, क्विंटन डी कॉकच्या तडाख्यासमोर चेन्नईचा संघ हरला
5
पंतप्रधानांचा नागपुरात मुक्काम, राजभवनात कडेकोट सुरक्षाव्यवस्था; शनिवारी भाजप पदाधिकाऱ्यांशी साधणार संवाद
6
हॅट्स ऑफ...‘अभिनव’ आदर्श...; तरुणाच्या अंत्यसंस्काराअगोदर आई व पत्नीने पार पाडले राष्ट्रीय कर्तव्य
7
 शिवसेनेचा एक-एक मतदारसंघ कमी होत राहिला तर...; तानाजी सावंतांची अजित पवारांसमोर नाराजी
8
मृत्यूच्या सहा वर्षांनी जिवंत झाला अब्जाधीश; 75 हजार कर्मचारी, जगभरात पसरलाय व्यवसाय
9
One Hand Sunner! रवींद्र जडेजाचा कॅच पाहून ऋतुराज थक्क्, जाँटी ऱ्होड्सनेही केलं कौतुक
10
४२ वर्षीय महेंद्रसिंग धोनीचा Innovative Six! सूर्यकुमार, एबीची '360°' पानी कम चाय
11
"खोटे सर्व्हे फेक कँपेन करतेय काँग्रेस..."! सोलापूरच्या प्रचारात शाहरुख खानच्या 'डुप्लीकेट'ची एन्ट्री, भाजपनं साधला निशाणा
12
लखनौच्या भेदक माऱ्यासमोर रवींद्र जडेजा उभा राहिला; MS Dhoni ची 360° फटकेबाजी
13
महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात 54.85% मतदान; उर्वरित २० राज्यांची परिस्थिती काय? कुठे सर्वाधिक... 
14
एवढी नाराजी...! या राज्यातील 6 जिल्ह्यांत एकही मतदान झालं नाही, कशामुळे नाराज आहेत लोक?
15
Rahul Shewale : "नाशिकचा तिढा लवकरच सुटेल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याबाबत घोषणा करतील"
16
अमित शाह यांनी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी दुपारी 12:39 हीच वेळ का निवडली? जाणून घ्या
17
सांगलीच्या जागेबाबत मोठी घडामोड: थेट राहुल गांधींचा उद्धव ठाकरेंना फोन, नेमकं काय घडतंय?
18
'काँग्रेसला मतदान करुन आपली मते वाया घालू नका', संजय निरुपम यांची बोचरी टीका
19
नारायण राणेंसोबत फॉर्म भरायला गेले, बाहेर पडताच किरण सामंत म्हणाले, धनुष्यबाण असता तर...
20
“१० वर्षांची हुकुमशाही संपणार, भाजपाचा दारुण पराभव अटळ”; नाना पटोलेंचा दावा

एक पत्र बाबासाहेबांना....()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 05, 2020 4:12 AM

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा चैत्यभूमीवर प्रत्यक्ष न जाता चैत्यभूमीच्या पत्त्यावर पत्र पाठवून डॉ. बाबासाहेब आंबेडकर ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा चैत्यभूमीवर प्रत्यक्ष न जाता चैत्यभूमीच्या पत्त्यावर पत्र पाठवून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्याचे अनुयायांना आवाहन करण्यात येत आहे. विशेष म्हणजे चैत्यभूमीच्या पत्त्यावर आतापर्यंत हजारो पत्रांचा पाऊस पडलाय. चैत्यभूमीवर हजारोपेक्षा जास्त तर दादर पोस्ट ऑफिस येथेही दररोज हजारो पत्रे येत आहेत.

महापरिनिर्वाणदिनानिमित्त दरवर्षी ६ डिसेंबर रोजी लाखोंच्या संख्येने अनुयायी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी दादरच्या चैत्यभूमीवर येतात. यावर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकरचा ६४ वा महापरिनिर्वाण दिन आहे. वर्षानुवर्षे या दिवशी न चुकता चैत्यभूमीवर जाणारे हजारो अनुयायी या वेळी कोरोनाच्या सावटामुळे मात्र जाऊ शकणार नाहीत. मात्र, अनुयायी आपल्या मनातील भावना अनोख्या पद्धतीने-पत्राद्वारे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत पोहोचवत आहेत.

महाराष्ट्र आणि देशभरातून जे अनुयायी चैत्यभूमीवर अभिवादनासाठी येऊ शकणार नाहीत अशांचे चैत्यभूमीच्या पत्त्यावर हजारोंच्या संख्येने पत्रे येत आहेत. या पत्रांपैकी अनेक पत्रे लहान मुलांनी लिहिली आहेत. देशाच्या कानाकोपऱ्यातून वेगवेगळ्या भाषेतली पत्रे चैत्यभूमीच्या पत्त्यावर पाठवली जातायेत. उर्दू, हिंदी, मराठी, इंग्रजी, तेलुगू अशा अनेक भाषांमधून ही पत्रे पाठवली जात आहेत.

बॉक्स

नागपुरातूनही दररोज हजारो पत्रे

नागपुरात समता सैनिक दलाचे प्रदीप गणवीर आणि तरुण सामाजिक कार्यकर्ते अनिकेत कुत्तरमारे हे अभियान लोकांपर्यंत पोहोचवत आहेत.

त्यांनी सांगितले की, ज्यांना कोरोना महामारीच्या काळात चैत्यभूमी येथे येऊन आपल्या उद्धारकर्त्याला अभिवादन करता येणे शक्य नाही, त्यांच्याकरिता हा उपक्रम राबविण्यात येत आहे. बाबासाहेबांप्रति असलेल्या आपल्या कर्तव्य भावनेतून हा उपक्रम राबवत आहे. आपण फक्त एवढेच करायचे आहे. कुटुंबातील प्रत्येक एका व्यक्तीने आपल्या नावे "अभिवादन महामानवाला" हा संदेश आणि स्वतःचे नाव तसेच स्वतःचा पत्ता लिहून एक पोस्टकार्ड चैत्यभूमी_स्मारक_दादर_पश्चिम_मुंबई_४०००२८ या पत्त्यावर पाठवावे." कोरोनाचा प्रादुर्भाव आणि चैत्यभूमीवरची गर्दी टाळण्यासाठी अनुयायांनी चैत्यभूमीवर अभिवादनासाठी येऊ नये, त्याऐवजी अभिवादन करणारे पत्र पाठवावे असेही आवाहन प्रशासनाकडून केले जातेय. याचा चांगला परिणाम दिसून येत आहे. नागपुरातूनही दररोज हजारो पोस्टकार्ड पाठवली जात आहेत. यातून डाक विभागालाही आर्थिक बळ मिळत आहे.