कतारमध्ये फसलेल्या भारतीयांना एअरलिफ्ट करणार भारत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2017 05:13 PM2017-06-22T17:13:36+5:302017-06-22T17:27:26+5:30

मुस्लिम देशांच्या बहिष्काराचा सामना करणा-या कतारमध्ये अनेक भारतीय अडकले असून त्यांची सुटका करण्यासाठी केंद्र सरकारने योजना आखली आहे

India to air the deceased Indians in the queue | कतारमध्ये फसलेल्या भारतीयांना एअरलिफ्ट करणार भारत

कतारमध्ये फसलेल्या भारतीयांना एअरलिफ्ट करणार भारत

Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 22 - मुस्लिम देशांच्या बहिष्काराचा सामना करणा-या कतारमध्ये अनेक भारतीय अडकले असून त्यांची सुटका करण्यासाठी केंद्र सरकारने योजना आखली आहे. भारतीयांना परत आणण्यासाठी विशेष विमानं पाठवण्यात येणार आहेत. कतारमध्ये जवळपास सात लाख भारतीय आहेत. 
 
दहशतवाद पसरवणे व प्रादेशिक शांतता भंग करणे या कारणांवरून सौदी अरेबिया, युएई, बहारिन व इजिप्तने कतारशी राजनैतिक संबंध तोडले आहेत. या सर्व देशांनी कतारवर दहशतवादाला समर्थन दिल्याचा आरोप लावला होता. यामुळे कतारमध्ये दैनंदिन गोष्टींचा तुटवडा निर्माण झाला असून परिस्थिती चिघळत चालली आहे. कतारला गरजेच्या वस्तूंचा पुरवठा करणा-या सौदी अरबने कतारला लागून असलेल्या सीमेवर सर्व प्रकारची देवाण घेवाण रोखली आहे. 
 
(दहशतवादाच्या मुद्यावर सौदी, बहारिन, युएई आणि इजिप्तची कतारला सोडचिठ्ठी)
 
नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या अधिका-याने दिलेल्या माहितीनुसार, 25 जून ते 8 जुलै दरम्यान एअर इंडियाकडून केरळ ते डोहादरम्यान विशेष विमानं उड्डाण घेतील. एअर इंडियाच्या 186 आसनांच्या 737 विमानाचा वापर करण्यात येईल. याशिवाय जेट एअरवेजदेखील मुंबई ते डोहा दरम्यान गुरुवार आणि शुक्रवारी 168 आसनांची क्षमता असलेल्या बी-737 विमानाचं उड्डाण करेल.
 
केंद्रीय परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी सोमवारी यासंबंधी केंद्रीय विमान वाहतूक मंत्री अशोक गजपती राजू यांच्याशी बातचीत केली होती. ज्या भारतीयांना मायदेशी परत यायचं आहे, मात्र बुकिंग मिळत नाही आहे त्यांच्यासाठी हे प्रयत्न सुरु आहेत. यानंतर मंत्रालयाने विमान कंपन्यांशी बातचीत केली आणि अतिरिक्त विमान उड्डाण करण्याचा निर्णय घेण्यात आला. नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने परराष्ट्र मंत्रालयाला पुर्णपणे मदत करण्याचं आश्वासन दिलं आहे. 
 
कतार 4 हजार गाईंना करणार एअरलिफ्ट -
 
कतारचा शेजारच्या देशांसोबत सुरु असलेला वाद दिवसेंदिवस चिघळत आहे. अनेक समस्यांचा सामना करावा लागत असतानाही कतारने मात्र कोणत्याही प्रकारचा करार करण्यास किंवा माघार घेण्यास नकार दिला आहे. आपल्यावर लावण्यात आलेल्या बंदीमुळे निर्माण झालेल्या समस्यांना तोंड देण्यासाठी कतार वेगवेगळ्या पर्यायांचा वापर करत आहे. यानिमित्ताने कतारमधील एका व्यवसायिकाने चार हजार गाईंना एअरलिफ्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. ब्लूमबर्गने दिलेल्या वृत्तानुसार, देशात दूध पुरवठा सुरळीत व्हावा यासाठीच या गाईंना एअरलिफ्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  
 
कतार अन्न आणि दूधासारख्या गरजू गोष्टींसाठी सौदीवर अवलंबून होतं. मात्र आता सौदीने सर्व प्रकारचे संबंध तोडले असल्याने देशात दूधसंकट उभं राहिलं आहे. या संकटाला सामोरं जात, सौदीला उत्तर देण्यासाठी कतारमधील व्यापारी मोताज अल खायात यांनी चार हजार गाईंना एअरलिफ्ट कऱण्याचा निर्णय घेतला आहे. मोताज पॉवर इंटरनॅशनल होल्डिंगचे अध्यक्षही आहेत. 
 

Web Title: India to air the deceased Indians in the queue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.